बारामती: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाले आहे. या धक्कादायक बातमीमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून प्रशासनाने तातडीने मोठे निर्णय घेतले आहेत.
अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आजचे सर्व नियोजित सरकारी आणि खाजगी कार्यक्रम रद्द केले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही तातडीने बारामतीकडे रवाना होत आहेत. दादांच्या पार्थिवावर बारामती येथे अंत्यसंस्कार होण्याची शक्यता असून, तिथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
सरकारकडून महत्त्वाच्या घोषणा:'दादा' या नावाने लोकप्रिय असलेल्या अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या प्रशासनावर आणि राजकारणावर आपली वेगळी मोहोर उमटवली होती. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकीय क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात आणि राज्यात त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने गोळा होत आहेत.